प्रतिनिधी हेमंत पाटील सातारा
सातारा – दिनांक १५ मार्च
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनआंदोलन उभे केले होते.. या मागणीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने येत्या ८ दिवसांत वर्षाला २५ ते ३० हजार कोटींचा होणारा घोटाळा बाहेर काढणार असून माझ्याकडे ई डी येऊन गेलीये त्यामुळे मला भीती नाही.
येत्या १५दिवसांत संपूर्ण राज्यात जाऊन व्यापक जनआंदोलन उभे करून या सरकारला गुडघे टेकायला लावून शेतकऱ्याला दिवसा वीज दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
साखर कारखान्याच्या घोटाळ्यापेक्षा प्रचंड मोठा घोटाळा विजेचा आहे तो बाहेर काढणार असल्याचे सांगत राज्यातील धरणांचे पांढऱ्या कपडे घालणाऱ्यांनी वेटोळे घातले असल्याची टीका आघाडी सरकारमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींवर केली आहे. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत ते मी ७ वर्षांपूर्वी करत होतो मात्र आता चोरांना सोडणार नसल्याचे सांगत घोटाळ्याचे सर्व पुरावे घेऊन मी कोर्टात सादर करणार – माजी खासदार राजू शेट्टी