Wednesday, July 24, 2024
Homeइतरशरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत - शिवाजीराव...

शरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत – शिवाजीराव आढळराव पाटील 

पुणे – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पंचायत समिती गटातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत,शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असं सांगून मतं मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत, अशा शब्दात आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर टीका केली. यावर खासदार डॉ अमोल.कोल्हे यांनी

  यापुढे आढळराव पाटीलांनी खासदार अमोल कोल्हे  यांच्या चंदेरी दुनियेची सुद्धा आढळराव यांनी खिल्ली उडवली. ‘आम्ही कुठे तरी चंदेरी दुनियेत लोकांना न्यायचं आणि खोटी आश्वासनं द्यायची असा प्रकार होत असल्याचा आरोप आढळराव पाटीलांनी केला. शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटलांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!