Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या अस्मितेला तडा देण्याचा प्रयत्न केल्यास आपण शांत बसून चालणार नाही...

महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा देण्याचा प्रयत्न केल्यास आपण शांत बसून चालणार नाही – आमदार रोहित पवार

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी आमदार रोहित पवार यांच्यासह इतर आमदार व नागरिकांचा आत्मक्लेश

कोरेगाव भीमा – दिनांक ३ डिसेंबर

श्री क्षेत्र वढू बुद्रुक ( ता.शिरूर) महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा देण्याचा व महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आपण शांत बसणार नाही. शिवनेरी किल्ल्यावर राज्यपाल पायी गेले यापेक्षा वाणीच्या माध्यमातून तुम्ही एकदा नाही तर दोन वेळा महान व्यक्तीचा अवमान करता यावरून त्यांची विचारसरणी कळते आमचा विरोध व्यक्तीला नाही तर विचारसरणीला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या व थोर व्यक्तीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्यांचा विरोध महाराष्ट्रात होतो , ज्यांना वाटते त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही अशा प्रकारची खालच्या पातळीवर वक्तव्य केले त्यांना वाटत असेल आम्ही शांतपणे राहू हे चूक आहे ते चुकले, ते असे बोलले नाहीत अशा लोकांची पाठराखण करतात त्यांचा सुद्धा विरोध करावा लागणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. या ठिकाणी आम्ही आमदार म्हणू आलेलो नाहीत तर एक नागरिक म्हणून आलेलो आहात महाराष्ट्राच्या विचारांचे पाटील म्हणून आले आहोत रायगडावर छञपती उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे वारस म्हणून गेले आहेत त्यांना माचा पाठिंबा असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून श्री क्षेत्र वढु बुद्रुक ( ता.शिरूर) येथील छञपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वारसा विचारांचा ,वसा महाराष्ट्राचा आत्मक्लेश करण्यासाठी व छत्रपतींच्या विचारांचे वारसदार म्हणून एकत्र येत आमदार रोहित पवार व इतर आमदारांसह नागरिकांनी एकत्र येत आत्मक्लेश करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर पुष्पहार वाहत नतमस्तक झाल्यानंतर वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा व अस्मितेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व इतरांचा निषेध व्यक्त करण्यात आला.अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार ,यासाठी ही बोलकी कृती मौन धारण करून निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांच्यामार्फत  संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश करण्यात आला यावेळी आमदार अशोक पवार,आमदार अमोल मिटकरी,आमदार अतुल बेनके,आमदार संदीप शिरसागर ,आमदार सुनील टिंगरे,आदर सुनील शेळके उपस्थित होते.

यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी “आज आम्ही आत्मक्लेश यासाठी करतोय की जर आम्ही आता शांत बसलो तर पुढच्या पिढ्या आम्हाला दोष देतील. चुकून वक्तव्य झालं असेल तर समजू शकतो मात्र हे वारंवार जाणूनबुजून केले जात आहे. हे लोक इतके निर्लज्ज, मस्तवाल आहेत की दिल्लीतील कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी केली नाही. मंगलप्रभात लोढाने देखील राजीनामा दिला नाही. हे जर असच सुरू राहील आणि आम्ही फक्त पाहत राहिलो तर आमच्या आगामी पिढ्या आम्हाला सोडणार नाहीत तसेच राज्यपाल पायी गेले तर काही उपकार केले नाहीत. चंद्रकांत पाटील जर खरे शिवभक्त असतील तर त्यांनी रायगडावर माझ्यासोबत पाणी न पिता पायी चढवून दाखवावं आणि मग सांगावं. राज्यपाल पायी गेले तर काही उपकार नाही केले त्यांनी. हा निव्वळ राज्यपालांना वाचवायचा प्रकार असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.

वाचण्यापेक्षा नाचण्यात तरुणाईला व्यस्त ठेवायचे आणि महापुरुषांना जाती जातीत विभागांत प्रयत्न करणे याविरोधात आत्मक्लेश आहे. यावेळी ऐतिहासिक संदर्भ देणाऱ्या आज्ञापत्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वाभिमानी व ज्वलंत इतिहासाचे दाखले देण्यात आले. यावेळी आपल्या शाहिरी आवाजाने

उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे व पोवड्याच्या माध्यमातून विचारांचा जागर करणाऱ्या शाहीर कांबळे व सहकाऱ्यांनी अत्यंत मनोवेधक पोवाडा सादर . यावेळी आमदार रोहित पवार, आमदार ॲड अशोक पवार, ,आमदार अमोल मिटकर, आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, अतुल बेनके, नितीन पवार,संदीप क्षीरसागर, जयदेव गायकवाड ,प्रशांत जगताप,सूरज चव्हाण,संजय दौंड ,जयदेव गायकवाड, सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, मल्हारराव होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, जुनेद दुर्व्यानी, प्राजक्ता तनपुरे, माजी सभापती सुजता पवार, सभापती मोनिका हरगुडे,पंडित दरेकर, राजेंद्र नरवडे, माजी सरपंच स्नेहल भुजबळ, लोचन शिवले, सुरेखा भोरडे,वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, अंजली शिवले, संगीता सावंत, लाला तांबे, पप्पू आरगडे,माजी सरपंच प्रफुल्ल शिवले,अंकुश शिवले, अनिल शिवले,माजी पंचायत समिती सदस्य पि. के. गव्हाणे व ग्रामस्थांसह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचा अत्यंत चोख बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला होता यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, शिरूर पोलीस स्टेशनचे सुरेशकुमार राऊत,रांजणगाव पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक व उप पोलीस निरीक्षक असा मोठा फौजफाटा होता.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!