Thursday, July 25, 2024
Homeइतरआमदार अशोक पवार यांची एक नगरपालिका व चार नगरपंचायतिची स्थापना करण्याची ...

आमदार अशोक पवार यांची एक नगरपालिका व चार नगरपंचायतिची स्थापना करण्याची पत्राद्वारे मागणी

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नागरीकिकरणामुळे पायाभूत सेवा सुविधांवर येणारा तान गावांची वाढती लोकसंख्येची घनता यामुळे भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय असणार आहे.

कोरेगाव भीमा – दिनांक २० मेसणसवाडी ( ता.शिरूर) आमदार अशोक पवार यांचा विकास कामांचा धडाका प्रभावशाली व गतिमान असून हाती घेऊ ते तडीस नेऊ या भूमिकेतून सदैव विकासकामांच्या ऍक्शन मोड मध्ये असलेल्या आमदार पवार यांनी शिरूर – हवेली तालुक्यात नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येच्या घनतेमुळे शिरूर – हवेली मतदार संघात लोणी काळभोर येथे नगरपरिषद तर शिरूरमधील शिक्रापूर, सणसवाडी व हवेलीतील उरुळी – कांचन , कदमवाकवस्ती या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्याची मागणी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे नुकतीच केली आहे . या पाचही गावांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा आमदार अशोक पवार करणार असून लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने या पाचही गावांची विकास व नागरिकांना मूलभूत सोयसुविधा पोचवण्यासाठी पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायत आणि नगर परिषदेत रुपांतरीत करण्याची हालचाली आमदार पवार यांनी सुरू केली आहे . आगामी काळात या गावांमध्ये नगरपरिषद व नगरपंचायत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून वाढत्या नागरीकरणासाठी याबाबत मोठा फायदा होणार आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या ३० हजार ३०५ च्याही पलिकडे गेल्याने या गावासाठी नगरपरिषद व्हावी तर शिक्रापूर ( लोकसंख्या २० हजार २६३ ) , सणसवाडी ( लोकसंख्या १३ हजार ५४३ ) तर हवेलीतील कदमवाकवस्ती ( लोकसंख्या १ ९ हजार ३२ ९ ) व लोणी – काळभोर ( लोकसंख्या २२ हजार ३१८ ) या चार गावांसाठी नगरपरिषद व्हावी या मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे . या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार पवार स्वत : करणार आहेत . त्यामुळे शिरुर – हवेलीत लवकरच नगर परिषद व नगरपंचायतींची घोषणा होईल , असा आशावाद दरेकर यांनी व्यक्त केला .

वाढते औद्योगीकरण, रोजगार , मोठ्या प्रमाणात होणारे नागरिकिकरण त्यामुळे पूरक व्यवसायांची वाढ यामुळे मोठ्या प्रमाणावर नगरिकिकरण व लोकसंख्या शिरूर व हवेली तालुक्यात वाढताना दिसत आहे याचा परिणाम सेवा सुविधा व विकासावर हित आहे .शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व सणसवाडी लोकवस्ती वाढत असल्याने लोकसंख्येची घनता वाढत आहे.या गावांमध्ये ग्रामपंचायतींना विकास करताना मर्यादा पडत आहेत. विकासकामे करताना समस्या येत असून या पार्श्वभूमिवर शिरुर – हवेली या दोन्ही तालुक्यातील व मतदार संघातील शिक्रापूर , सणसवाडी ( ता . शिरुर ) व उरुळी कांचन , कदमवाकवस्ती तसेच लोणी – काळभोर ( ता.हवेली ) या पाच गावांतील ग्रामपंचायतीचा दर्जा नगरपंचायत व नगर परिषदेत वर्ग करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी पाऊल उचलले आहे .

मोठ्या प्रमाणात होणारे औद्योगीकरण ,रोजगारांच्या संधी त्यामुळे होणारे नागरीकिकरण यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या घणतेमुळे पायाभूत सेवा सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो विकासाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अशोक पवार प्रयत्नशील असतात यामुळे पाच ग्रामपंचायतींचे रूपांतर एक नगरपालिका व चार नगरपंचायती करण्यासाठी व जनतेच्या कल्याणासाठी आमदार पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. – पंडित दरेकर ,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!