कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भिमा यांच्या विषयी प्रहार अपंग क्रांती संघटना यांनी ऐन दिवाळीत मनगटावर चुना लावून बोमाबोंब आंदोलन करत तक्रार अर्ज दिला होता. याबाबत गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवक रतन दवणे यांचा लेखी खुलासा मागवण्यात आला होता पण वरिष्ठांच्या पत्रात दिलेल्या वेळेत ग्रामसेवक दवणे यांनी लेखी खुलासा न केल्याने रीमाईंडर लेटर दिल्यावर अखेर ग्रामसेवक दवणे यांनी लेखी खुलासा सादर केला असून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या लेखी पत्राच्या मागणीनुसार कारवाई होणार का ? की त्याबाबत वरिष्ठ कोणता निर्णय घेतात याकडे दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.
सादर केलेल्या लेखी खुलास्याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नसली तरी वरिष्ठ पातळीवर प्रकरण गेले असल्याने याबाबत आता काय निर्णय होईल याकडे पुणे जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती संघटनेतील सदस्यांचे लक्ष असून शिरूर तालुक्याचे पदाधिकारी कुंडलिक वायकुळे व कोरेगाव भिमा येथील सहकारी याबाबत जागरूक असून योग्य न्याय मिळेपर्यंत व कारवाई होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे
ग्राम सेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भिमा यांच्या कारभाराविषयी निषेध म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटना कोरेगाव भिमा यांच्या वतीने ऐन दिवाळी सणाच्या वेळी मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते तसेच त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार करत चौकशी व कारवाईची मागणी केली होती याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी दखल घेत ग्रामसेवक दवणे यांना लेखी खुलासा मागितला होता हा खुलासा देण्यासही ग्रामसेवक रतन दवणे यांनी दिरंगाई केली होती.याबाबत गट विकास अधिकारी यांनी रीमाईंडर लेटर दिले होते अखेर ग्रामसेवक रतन दवणे यांनी लेखी खुलासा सादर केला आहे.
याबाबत गट विकास अधिकारी महेश डोके यांनी रतन दवणे यांनी लेखी खुलासा सादर केला असून ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भिमा यांच्या कारभाराविषयी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
![](http://swarajyarashtra.com/wp-content/uploads/2023/12/imgonline-com-ua-twotoone-oBCHUSycMT8cz8-1024x667.jpg)
ग्रामसेवक रतन रामराव दवणे अपंगांशी खोटे बोलून अपंग निधी जमा करण्यात आल्याचे खोटे बोलून पदाचा गैरवापर करत जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात टाळाटाळ करणे, पदाचा गैरवापर करत अपंगत्वाचा गैरफायदा घेण्याचा प्रयन्त करत निधी न देणे त्यासाठी अपंगांशी खोटे बोलने, अमानवी व निंदनीय प्रकार करण्यात आला आहे. ग्रामसेवक निव्वळ फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, अपंगांना निधी देण्यास टाळाटाळ, कर्तव्यात कसूर, कार्यलयीन कामकाज संहितेचे उल्लंघन, दिव्यांगांना फसवण्यासाठी पदाचा गैरवापर करणे, आर्थिक पिळवणूकीचा प्रयत्न करणे, दिव्यांग कायद्याचे उल्लंघन करणे, दिव्यांगांना न्याय न देता त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी व आर्थिक दिशाभूल करण्याचा प्रयत्न याबाबत त्यांच्याबर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी प्रहार अपंग क्रांती संघटनेने पत्राद्वारे मागणी केली होती. या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पत्रव्यवहारास विचारात घेतले जाईल का ? दिव्यंगांच्या हक्काबाबत शासन आता तरी संवेदनशील व मानवतावादी दृष्टिकोनातून न्यायाच्या हक्काचे रक्षण करणे येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.